May 13, 2026
4475a9c1-0dd4-4a6f-9dc9-f803111b8534

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

पंढरपूर : गावामध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या वतीने नागरिकांना दिलासा देण्यासाठी दररोज तीन पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या टँकर सेवांचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विद्या रमेश गायकवाड, पंचायत समिती सदस्या लताबाई, कानडे, माजी सरपंच अख्तर शेख, मेहबूब चौधरी, के. व्ही. गायकवाड, महिंद्रा खोतकर, रोहित राऊत, ग्रामपंचायत सदस्य आमेर पठाण, संतोष चोरडिया, ग्रामसेवक हरीश आंधळे, करू सुकधन, दिपक कानडे, मुजाहिद शेख, रुबीना शेख, डॅनी जगताब, अविनाश घुले यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंचायत समितीने तातडीने तीन टँकरची व्यवस्था करून नागरिकांना दिलासा दिला आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

……..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!