February 4, 2026
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

वाळूज महानगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, स्पष्ट वक्ते व कणखर नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्य शासनाने दोन दिवसांचा राज्यस्तरीय दुखवटा जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रमात बदल केला आहे.

दुखवट्याच्या कालावधीत उमेदवारांना प्रचार करणे शक्य नसल्याने, प्रचारासाठी दोन दिवसांची वाढ देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार, पूर्वी दि. ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आता दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. तसेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

हा सुधारीत निवडणूक कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला असून, त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याची माहितीही आयोगाने स्पष्ट केली आहे.

॰॰॰॰


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!