July 7, 2025
e82a601a-102d-4ea0-b4a7-dd0ffc25bf1a-1.jpg

२० वर्षीय नीट विद्यार्थ्याची आत्महत्या — कमी गुणांचा ताण ठरला जीवघेणा

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

वाळूज महानगर (१७ जून २०२५):
“आई, मी नालायक नाही… पण आता सहन होत नाही…”
असं काही न सांगताच, एक २० वर्षांचा तरुण — श्रीकांत अंगद शिंदे — आपल्या हयातीतून निघून गेला. नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने निर्माण झालेल्या तणावाने त्याला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केलं.

श्रीकांत गेल्या दोन वर्षांपासून डॉक्टर होण्यासाठी मेहनत घेत होता. वाळूज एमआयडीसी हद्दीतील रांजणगाव शेणपुंजी परिसरात त्याचे कुटुंब राहत होते. मंगळवारी दुपारी, घरातील स्वयंपाकघरात ceiling fan ला टॉवेल बांधून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. कुटुंबीयांनी तातडीने त्याला घाटी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

एक शांत, अभ्यासू आणि स्वप्नाळू मुलगा…
शेजारी आणि नातेवाईकांनी अश्रूंच्या भरल्या डोळ्यांनी सांगितलं – “श्रीकांत खूप अभ्यासू होता. कधी कुणाला रागावलेला आठवत नाही. कायम पुस्तकांत गर्क… तो निघून गेला यावर विश्वासच बसत नाही!”

शैक्षणिक यंत्रणेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ…

NEET सारख्या राष्ट्रीय परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण किती प्रचंड आहे, हे या घटनेतून पुन्हा समोर आलं आहे. गुण हेच आयुष्याचं मोजमाप नाही… हे सांगणारे कुठे आहेत?

अभ्यास आणि यशाच्या ओझ्याखाली काही स्वप्नं कायमची हरवतात…
स्वप्नांच्या गळ्यातच दोर बांधून काही जीव शांतपणे निघून जातात…

पोलिस तपास:
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस अंमलदार एकनाथ गिरी करत आहे..

***


error: Content is protected !!