September 16, 2026


छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल व अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. इंधन टंचाईच्या अफवा आणि संभाव्य दरवाढीमुळे राज्यातील विविध भागांत पेट्रोल पंपांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इंधन विक्रीवर तात्पुरत्या मर्यादा लागू केल्या आहेत. ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासनाच्या आदेशानुसार दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत पेट्रोल देण्यात येणार आहे. तसेच चारचाकी व तीनचाकी वाहनांसाठी २,००० रुपयांपर्यंतच इंधन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध राहावे, हा उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, इंधन साठवणुकीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी व आवश्यकतेपुरतेच इंधन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वरील बातमी वर न्युज पोर्टल साठी मला थेंबनेल साठी jimini promt तयार करुन द्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!